महाराष्ट्र कवी मंच*उपक्रम क्र.28 ✍🏻अक्षता अजित उपरे*

 ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️

     *महाराष्ट्र कवी मंच*

♦️♦️♦️♦️♦️♦️♦️


✍🏻 *उपक्रम क्र.२८* ✍🏻


🌸 *पद्य प्रकार :- सुनीत* 🌸


           *विषय - प्रेम*


कोरली नावे ऐतिहासिक वास्तूवर 

म्हणजे का प्रेम अजरामर होतं ?

खरचं या गोष्टींना प्रेमात एवढं महत्व असतं ?

की फक्त दिखावा असतो वरवर


राधा कृष्णाची जोडी झालीच ना अजरामर

त्यांनीही केलंच होतं ना प्रेम त्याकाळी !

पण त्यांच्या प्रेमाला उपमाच नाही मुळी

त्यांसम प्रेमाची भावना का नाही दिसली आजवर ?


कसलीच अपेक्षा नसते मुळी खऱ्या प्रेमात

हे समजणे खरचं इतके अवघड आहे का ?

जिवलग आपला रहावा नेहमी सुखात

अस वाटणं म्हणजे खरं प्रेम नाही का ?


खरं प्रेम म्हणजे दोन आत्म्यांच मनोमिलन

भिन्न देही हृदयी भासे कायम एकची स्पंदन

 

✍🏻 *अक्षता अजित उपरे*

*पनवेल* *(रायगड)*

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट